मुख्यालयी न राहता अधिकारी, कर्मचारी लाटतात घरभाडे भत्ता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र :-जिल्हापरिषद मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात .कल्याणकारी शासक म्हणून या सेवा जनतेला विशेशता ग्रामिन भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून बघितले जाते याकरिता जिल्हा परिषद मार्फत कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जाते.कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक ,मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक इत्यादींना त्यांच्या मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे यासाठी शासनाने हे सर्व कर्मचारी मुख्यालयी असल्याबाबत संबंधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव प्राप्त करून घेणे हे बंधनकारक केले आहे परंतु कामठी तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक ,मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याचे वास्तव् आहे.व मुख्यालयी राहत असल्याची खोटी बतावणी दर्शवून बहुतेक कर्मचारी शासनाची तसेच जनतेची सर्रास फसवणूक करीत आहेत.तसेच खोट्या पुराव्या च्या आधारे घरभाडे, प्रवास भत्ता तसेच इतर लाभ हे कर्मचारी घेत आहेत अशा प्रकारे हे कर्मचारी शासनाच्या निधींचा खूप मोठ्या प्रमाणात अपहार करोत आहेत.वास्तविकता मुख्यालयी न राहता घरभाडे घेणे ही शासनाची शुद्ध फसवणूक असून गुन्हा आहे.तेव्हा अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर शासनाचे अंकुश लागणार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवक वा इतर कर्मचारी कडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत असून या कर्मचारी लोकांची हुकूमशाही अजूनही सुरू आहे.या सर्व बाबींचा विचार करून सामान्य जनतेचा त्रास दूर व्हावा व कामठी पंचायत समितीच्या अधिनस्थ मुख्यालयी न राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता रोखण्यात यावा तसेच ज्यांनी खोटे दाखले सादर करून घरभाडे घेतले अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून सरकारी निधी शासन तिजोरीत जमा करण्यात यावी व अशा कर्मचाऱ्या विरुध्द शिस्तभंगाची कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे,.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

Fri Jun 17 , 2022
 मुंबई (रानिआ) : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com