संविधानाचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसचेच! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घणाघाती टीका

– नरेंद्र नगर, भेंडे ले-आऊट मैदान आणि पांढराबोडी येथे जाहीर सभा*

नागपूर :- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसवाले करतात. पण केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांनी ‘घटनेचे मूलतत्त्व बदलता येणार नाहीत’ असा निर्णय दिलेला आहे. पण याच काँग्रेसवाल्यांनी ऐंशी वेळा घटना बदलली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केले,’ अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. गडकरी यांनी आज (शनिवार) केली.

नरेंद्र नगर येथील लक्षवेध मैदानावर, भेंडे ले-आऊट मैदान आणि पांढराबोडी येथे ना. नितीन गडकरी यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सुबोध मोहिते, माजी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक संदीप गवई, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, माजी नगरसेवक किशोर वानखेडे यांची उपस्थिती होती. 

साठ वर्षांत काँग्रेसने जेवढी कामे केली नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे भाजपने गेल्या दहा वर्षांत देशात, राज्यात आणि शहरात केलीत. काँग्रेस नेत्यांनी आपल्या कार्यकाळात फक्त स्वार्थ बघितला, अशीही टीका ना. नितीन गडकरी यांनी केली. ‘मिहानला काही लोकांनी खूप विरोध केला होता. आज त्याच मिहानमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. देशातील आणि विदेशातील मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आल्या आहेत. मिहानचा विस्तार करण्याचाही विचार सुरू आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

‘कृषी क्षेत्रात मी नवनवीन प्रयोग करतो आणि शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देतो. मध्य भारतातील सर्वांत मोठे अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो. पण निवडणूक किंवा राजकारण बघून शेतकऱ्यांसाठी अॅग्रोव्हिजनचे आयोजन करत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, त्यांच्याकडे सुख-समृद्धी नांदावी यासाठी माझे प्रयत्न आहेत,’ अश्या भावना ना. गडकरी यांनी व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोंडपिपरीला दिलेला शब्द पाळला; काँग्रेसने काय दिले? - ना. सुधीर मुनगंटीवार यांचा खडा सवाल

Sun Apr 14 , 2024
चंद्रपूर :- गोंडपिपरीच्या सभेत विकासनिधी आणण्याचा शब्द मी दिला होता. २३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी आणून मी शब्द पूर्ण केला, पण काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने काय केले?, असा खडा सवाल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मला लोकसभेत निवडून दिले तर गोंडपिपरीचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त करून आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी १९ एप्रिलला कमळाचं बटण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com