संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16:-आजच्या वर्तमान स्थितीत जगावर युद्धाचे सावट पसरले आहे या परिस्थितीतून समस्त मानव जातीला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचे विचारच या बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वात शांतता स्थापित व्हावी, बुद्धांचे विचार पुनःश्च अंगीकृत केले जावे आणि मानव सदमार्गाला लागावा म्हणून भारतीय बौद्ध महासभा कामठी शाखा, समता सैनिक दल कामठी आणि कामठी च्या समस्त विहार शाखांच्या वतीने 6 ते 16 मे पर्यंत कामठी तील विहारा विहारात विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या विश्वशांती धम्मदेसना कार्यक्रमा अंतर्गत दहा दिवस शहरातील विविध विहारात धम्मदेसना करीत तथागत वेल्फेअर बुद्ध विहारात झालेल्या धम्मदेसनाने या दहा दिवसीय विश्वशांती धम्मदेसना कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.
या धम्मदेसना कार्यक्रमाची सुरुवात 6 मे ला करीत दररोज सकाळी साडे सहा ते रात्री 9 वाजेपर्यंत धम्मदेसना सुरू होती. या धम्मदेसना कार्यक्रमाचा शुभारंभ जयभीम चौकातील प्रज्ञा शिल करुणा बुद्ध विहारातुन करण्यात आली होती .यामध्ये सिद्धार्थ बुद्ध विहार,चंद्रमनी बुद्ध विहार,नाग बुद्ध विहार,राहुल बुद्ध विहार संलग्नित होते.7 मे ला धम्म दीप संघ बुद्ध विहार, 8 मे ला प्रबुद्ध विहार, 9 मे ला हरदास बुद्ध विहार, 10 मे ला तथागत बुद्ध विहार,11 मे ला सम्यक संबुद्ध विहार,12 मे ला धम्म साधना संघ बुद्ध विहार, 13 मे ला आनंद बुद्ध विहार,14 मे ला गौतम बुद्ध विहार तर ,15 मे ला तथागत वेल्फेअर बुद्ध विहार येथे धम्मदेसना कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला .तर 16 मे ला बुद्ध जयंती विशेष कार्यक्रम अंतर्गत सकाळी 9 वाजता जयस्तंभ चौक कामठी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ध्वजारोहण करण्यात आले .तसेच शुक्रवारी बाजार चौक परिसर स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक विशेष बुद्ध वंदना करण्यात आली. तर रात्री 8 वाजता समस्त विहाराविहारातून विश्व शांती कँडल मार्च काढून जयस्तंभ चौक येथे या कँडल मार्च चा समापन करण्यात येणार आहे.
दहा दिवसीय विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचा समारोप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com