अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी व नागरिक वंचित राहू नये याची दखल घ्या – आ. रहांगडाले

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तिरोडा तालुक्यातील चिखली,भिवापूर,गराडा,लोधीटोला,धादरी, उमरी, सोनोली, बिरोली,घाटकुरोडा या गावात पुराचे पाणी गेल्याने शेती, घरांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांची जीवित हानीसुद्धा झालेली आहे. याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी पूरग्रस्त गावात जावून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची बैठक बोलाविली असून अतिवृष्टी मुळे ज्यांचे नुकसान झाले आहेत त्यांच्या शेतीचे व घरांचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, जि.प.सदस्या माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, प.स. सदस्या कविता सोनेवाने, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, उपसभापती हुपराज जमाइवार, मंडळ अधिकारी बोडके, संबधीत साझ्याचे तलाठी, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिंगना में एक शाम शहीदों के नाम..

Sun Aug 14 , 2022
हिंगना – देश के 75 वी आजादी के उपलक्ष्य मनाए जा रहे अमृत महोत्सव में हिंगना तहसील में भी विविध कार्यक्रम का अयोजन किया गया। जिसमे हिंगना तहसील कार्यालय में रविवार को एक शाम शहीदों के नाम के राहत देश भक्ति गीतों का आयोजन किया गया। इस वक्त तहसीलादार प्रियदर्शनी बोरकर, नायब तहसीलदार महादेव दराडे, निलेश कदम, ज्योति भोसले, मंडल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com