जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या – अनिल खंडागळे

– आदर्श आचारसंहितेबाबत आढावा बैठक

यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाच्यावतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. घोषणेनंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी आदर्श आचारसंहितेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला खंडागळे यांच्यासह उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दरोळी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.सुखदेव राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आचारसंहिता लागल्यानंतर सर्व प्रकारचे राजकीय बॅनर, पोष्टर, होर्डिंग, कटआऊट, जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश आहे. त्याप्रमाणे शासकीय व खाजगी ईमारतींवरील राजकीय जाहिराती, फोटो काढणे आवश्यक असून त्यासाठी आयोगाने कालावधी निश्चित करून दिला आहे. या कालावधीत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व पुढे करावयाच्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली. कालमर्यादेत या बाबींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कोणत्याही प्रकारचे पोष्टर, बॅनर, कटआऊट यापुढे पुर्व परवानगीशिवाय लावल्या जावू नये, असे निदर्शनास आल्यास आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्य कारवाई केली जावी. शासकीय ईमारतींवर प्रचार करणे प्रतिबंधात्मक आहे. खाजगी ईमारतीवर देखील राजकीय स्वरूपाचे काही लावावयाचे असल्यास स्थानिक संस्था व ईमारत मालकाची परवानगी आवश्यक आहे. जी शासकीय कामे सुरु आहे, तेवढीच सुरु ठेवता येतील. जी कामे सुरुच झाली नाही, अशी कामे करता येणार नाही.

अतितातडीने करावयाची कामे पुर्व परवानगीने केली जावी. यापुढे कोणतेही काम करतांना विभागांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खात्री व पुर्व परवनागीनेच करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी संजय दैने

Thu Oct 17 , 2024
– 972 मतदान केंद्र : 24 मतदान केंद्र वाढले – 8 लाख 19 हजार 570 मतदार – 7 हजार मतदान कर्मचारी तर 17 हजार सुरक्षा कर्मचारी – 5 हेलिकॉप्टरची मागणी  गडचिरोली :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com