नागपूर : ई-कचरा सध्या सर्वत्र समस्या ठरत आहे. नागरिकांच्या घरी वर्षानुवर्षे ई-कचरा तसाच पडलेला आहे, यापासून संभाव्य धोका त्यांना लक्षात येत नाही. नागपूर शहरातील ई-कच-याचे योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरीटेक्स प्रा. लि. द्वारे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मंगळवार १० व ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान विशेष ई- कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेले बॅटरी, बंद पडलेले मोबाईल, चार्जर, रिमोट, हेडफोन व अन्य ईलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रवर आणावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
नागपूर शहरामध्ये निर्मित होणारा ई-कचऱ्याचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया हे ई-कचरा व्यवस्थापन संशोधन नियम २०१८ अन्वये योग्यरीत्या लावण्याकरीता मानपद्वारे मे. सुरीटेक्स प्रा. लि, नागपूर यांना प्रायोगिक तत्वावर काम देण्यात आले आहे. याव्दारे शहरातील विविध भागातून ई- कचरा स्व:खर्चाने संकलीत करुन विल्हेवाट लावण्यात येणात आहे.
या केंद्रावर ई- कचरा सुरीटेक्स प्रा. लि. च्या वतीने १५ प्रति किलो या दराने स्वीकारले जाणार आहे. तरी नागपूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांनी स्वतःच्या घरातील वापर केलेल्या/उपयोगी नसलेल्या ई-वेस्ट जसे नादुरुस्त ईलेक्ट्रॉनिक/ईलेक्ट्रीकल उपकरणे ईत्यादी वस्तू या विशेष संकलन केंद्रावर मे. सुरीटेक्स प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींकडे जमा करावे आणि शहरामध्ये निर्माण होणाऱ्या ई-वेस्टची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.