संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात बदलत्या जीवनशैलीनुसार खवय्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे.हॉटेलमध्ये चिकन लेगपीस,चिकन लॉलीपॉप,चिकन तंगडी यासह अनेक खाद्य पदार्थ मोठ्या चवीने खात आहेत मात्र बहुधा हॉटेल मध्ये हे पदार्थ एकदा वापरल्या नंतर उरलेल्या काळ्या कुट्ट तेलात पुन्हा तळले जात असल्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.मात्र असे दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र यावर येथील अन्न व औषधी प्रशासन विभाग निदारवस्थेत असून गाढ झोपेची भूमिका घेत असल्याने कामठी तालुक्यातील बहुतांश हॉटेल मध्ये असा दूषित खाद्य पदार्थ विकण्याचा व्यवसाय बेफिकीरपने सुरू आहे.
कामठी तालुक्यात सुरू असलेल्या बहुतांश हॉटेल मध्ये खाद्य पदार्थ बनविणे तसेच मांसाहारी पदार्थ तळण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा वापरलेल्या तळलेल्या तेलाचा वापर केला जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नुकतेच महाशिवरात्रीच्या पर्वावर उपवासाचा नावावर घेतलेले खाद्य पदार्थमुळे कित्येकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.तेव्हा येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाने अशे कृत्य करणाऱ्या हॉटेल वर नजर ठेवून वापरल्या जाणाऱ्या काळ्या कुट्ट तेलाची तपासणी करून हॉटेल व्यवसायीकावर कारवाई करावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
– फाईल फोटो