थंडीत बेघरांना मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

चंद्रपूर :- उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.

हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे त्यानुसार नागरी बेघरांना निवाऱ्यात आणण्याची सोय करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. रात्रीच्या सुमारास कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने कस्तुरबा रोड,आझाद बगीच्या जवळील आसरा बेघर निवारा केंद्र तयार केले आहेत.

शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे नागरी भागातील बेघरांसाठी दर बुधवारी सर्वेक्षण करण्यात येते. बेघर निवारा केंद्राची माहिती जरी सर्वांना असली तरी अनेक गरजू स्वतःहुन या केंद्रापर्यंत येत नाही. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री वरोरा नाका पूल,बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या बेघरांना थंडीपासुन संरक्षण मिळण्याचे दृष्टीने त्यांना ब्लॅंकेट,चादर,सतरंजी,पलंग,स्वेटर,चहा व जेवणाची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत महिलांना कर्जवाटप निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार

Mon Dec 18 , 2023
नागपूर :- नागपूरस्थित निर्मल अर्बन को-ऑप बँक, नंदनवन शाखेच्या वतीने खास महिलांसाठी संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत सहा महिलांना प्रत्येकी ५० हजार प्रमाणे ३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या योजनेचे उद्दिष्ट महिलांच्या आर्थिक उत्थानास चालना देणे हे आहे. रिझर्व्ह बँकेच्या १६ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार बँकेच्या संचालक मंडळाने ४.१२.२०२३ चा सभेमध्ये संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत कर्जवितरण करण्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!