स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राचार्य डॉ रतनलाल पहाडीच्या अंत्यसंस्काराला भाजप आमदारासह बहुतांश भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची दांडी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक माजी प्राचार्य डॉ रतनलाल पहाडी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सकल जैन समाज बांधवासह समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

अंत्यदर्शन घेणाऱ्यामध्ये माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जी प अध्यक्ष मुक्ता कोकुर्डे,जी प उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, प्रसन्ना तिडके, कांग्रेस कामठी शहराध्यक्ष रमेश दुबे,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी नगरसेविका वैशाली मानवटकर,लक्ष्मण संगेववार, आदी गणमान्य नागरिकांसह नायब तहसीलदार अमर हांडा, प्रशासक संदीप बोरकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सिंग आदी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मात्र दरम्यान या मतदार संघात भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर हे दोन आमदार असूनही यातील एकही आमदार या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही यामध्ये आमदार बावनकुळे यांच्या मातोश्री चे चौदावी चा कार्यक्रम असल्याने बावनकुळे अपवाद ठरू शकतात मात्र आमदार टेकचंद सावरकर यांची अनुपस्थिती नोंद करण्यात आली इतकेच नव्हे तर भाजपचे बोटावर मोजणारे दोन चार कार्यकर्ते सोडले तर भाजप चे बहुतांश पदाधिकारी ,कार्यकर्ते या अंत्यसंस्कार कार्यक्रमात न दिसल्याने शहरातील इतकी मोठे दिग्गज व्यक्तीमत्त्व असलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात दांडी मारल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत याबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत होती.

याप्रसंगी कामठी येथील जैन समाज भवन सभागृहात असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ रतनलाल पहाडी यांच्या पार्थिवावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज लपेटून व पुष्पचक्र अर्पण करून पोलीस दलाने शोकधून वाजवून मानवंदना दिली.ही अंत्ययात्रा आजनी नवीन कामठी मोक्षधाम येथे पोहोचताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलीस दलाने त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज काढून जैन सकल समाजाचे मान्यवर प्रतिनिधी आशिष जैन यांच्याकडे सुपूर्द केला. पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून शोकधून वाजवून मानवंदना दिली.तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ रतनलाल पहाडी यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.शोकसभेचे संचालन आशिष जैन यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थी अवस्थेत प्रा.रतन पहाडी यांच्यात देशभक्तीचा उत्साह संचारला होता

Sun Jul 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  स्वातंत्र संग्राम सैनिक प्रा. रतन पहाडी : राहिल्या फक्त आठवणी कामठी :- 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरूध्द “भारत छोडो”चा नारा दिला होता. त्यांनी चालविलेल्या या आंदोलनात इंग्रजांची दमछाक करणा-या स्वातंत्र संग्राम सैनिकांमध्ये कामठी शहर व कामठी तालुक्यातील एकुण 26 लोकांचा समावेश होता. यात प्रामुख्याने प्रा. रतन पहाडी यांच्या नावाचा समावेश होता. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com