नागपूर : संवैधानिक न्याय, हक्क व अधिकाराच्या मागणीसाठी गोवारी समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या गोवारी बांधवांना मंगळवारी (२३ नोव्हेंबर) शहीद दिनी भाजपाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आदरांजली अर्पण केली. झिरो माईल येथील शहीर गोवारी स्मारकस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास राऊत, मारोतराव काळसर्पे, सुरेश दुधकावरे, जयदेव राऊत, शैलेश बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
गोवारी समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान झालेल्या गोळीबार व चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या शहीद बांधवांच्या बलीदानाला स्मरण करून त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.