कामठी तालुक्यातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद करा – माजी अध्यक्ष संदीप कांबळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मागील खूप वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत.मात्र त्यांच्यासाठी शासनाची कुठलीही योजना नाही. एवढेच काय तर आता शासनाच्या नियमाप्रमाणे वय वर्षे 58 वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारानासुद्धा अधिस्वीकृती नोंद नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही.कारण ते पत्रकार अधिस्वीकृती धारक नाहीत तेव्हा शासनाने याकडे लक्ष पुरवून विशेष भाग म्हणून पत्रकारांना योग्य तो न्याय द्यावा व अधिस्वीकृती बहाल करावी अशी मागणी कामठी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धनादेशाने वीज देयकाचा भरणा करतांना काळजी घ्या

Fri Aug 25 , 2023
नागपूर :- महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी राज्यभरात दरमहा हजारो धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885/- रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही अनेक वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. धनादेश अनादरीत झालेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!