![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात अटीतटीची लढत निर्माण झाली आहे. कारण, चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यामुळे या सहा जागांवर कोणाचं सर्वाधिक वर्चस्व राहतंय यावरच आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून असल्याचंही बोललं जातंय.