संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्ताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी प्रत्येकी 10 हजार ची मदत केली परंतु जवळपास 250 लोकांना तांत्रिक अडचणी मुळे अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.
तहसील आणि नगर परिषद कार्यालयाने समन्वय साधुन सर्व पात्र नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भाजपा पदाधिकारीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार एस आर बमनोटे याना निवेदना द्वारे केली आहे.
शिष्टमंडळात लालसिंग यादव,संजय कनोजिया, उज्वल रायबोले, प्रतिक पडोळे,कामरान हैदरी यांचा समावेश होता.