नागपूर :- अजनी रेल्वे स्टेशन परिसरात 333 करोड रुपये खर्चून केबलचा उडान पूल बनत असून एका वृक्षामुळे पन्नास टक्के पुलाचे काम थांबल्याची बातमी एक महिन्यापूर्वी आली होती. तो वृक्ष आज तोडून तो मार्ग क्लियर केला.
शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी अजनी रेल्वे पूल बांधला असून त्याचे लाईफ संपल्यामुळे अनेक दिवसापासून तो नवीन बांधकामाच्या प्रतीक्षेत होता.
एक वर्षापूर्वीपासून त्यावरील जड वाहतूक बंद केली. तसेच दोन्ही साईडला मध्ये खांब गाढण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी भीषण झाली. मध्ये गाढलेल्या विनाकारणच्या खांबामुळे ट्राफिकला अडथळा निर्माण झाल्याने चार चाकी वाहनामुळे दुचाकी वाहनेही अडकुन पडतात. पुलावरील लोड कमी करण्यासाठी दोन्ही दिशेकडे गाढलेले मधले दोन खांब काढले तर वाहतूक आणखी सुरळीत होऊ शकते.
तोपर्यंत या केबल पुलाचे काम जोमात करावे जेणेकरून मेडिकल व दक्षिण नागपुरात जाणारा मुख्य मार्ग क्लिअर करता येईल. अशी सूचना बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.