नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या लोकाभिमुख असून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. योग्य नियोजन व जनजागृती करून मार्च 2023 पर्यंत उद्दिष्टांची पूर्तता करावी असे निर्देष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज विभागीय प्रादेशिक संचालक नगर परिषदेची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नगरपरिषदेच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके, जिल्हा सहाय्यक आयुक्त् अतुल पंत, याची उपस्थिती होती . भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील जिल्हाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची दुरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थिती होती.
आठावा बैठकीमध्ये नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत यांनी 45 टक्के मालमत्ता व पाणीपट्टी कर उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित जिल्ह्यांनी 40 टक्के पर्यंतचे काम पूर्ण केली आहेत. याप्रमाणे उर्वरित काम इतर जिल्ह्यांनी दिलेल्या वेळेत 100 टक्के पूर्ण करावीत, अशा सुचना बिदरी यांनी दिल्यात. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अमृत 1.0 अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0, माझी वसुंधरा अभियान, मालमत्ता, पाणीपट्टी कर वसुली तसेच नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये वर्ग क व ड ची रिक्त पदे भरती बाबत विषयनिहाय उपस्थितांना मार्गदर्शन केले.