प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले बीएलए नियुक्त करावे – तहसीलदार गणेश जगदाळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- नुकतेच लोकसभा निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत मतदारांच्या बऱ्याच तक्रारी ऐकिवास आल्या ,अक्षरशा बहुधा मतदारांना मतदानापासून वंचीत राहावे लागली याची शोकांतिका आहे .यात दुरुस्ती करण्याच्या हेतूने कुणीही मतदार मतदानापासून वंचीत न राहावे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीच्या शुद्धीकरण कामाला गती देण्यात येत असून भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानुसार उद्या 25 जून ते 24 जुलै या कालावधीत मतदार यादीचा संक्षिप्त कार्यक्रम राबविण्यात येत आहे तेव्हा कामठी विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना तसेच सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावे तसेच मतदारांचे नाव मतदार यादीत नसेल अशा मतदारांनी आपले नाव नियमानुसार आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्र 6 भरून विहित मुदतीत कामठी तहसील कार्यालयात जमा करावे वा https://ceoelection.maharashtra.gov.in येथे सादर करावे व प्रत्येक राजकीय पक्षाने बीएलओ च्या सोबतीला आपापले बीएलए नियुक्त करावे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर प्रशासनाच्या वतीने उद्या 25 जून पासून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण घोषित कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार गणेश जगदाळे यांनी आज तहसील कार्यालयात झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधी बैठकीत केले.

याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार मयूर चौधरी,किशोर दडमल,तसेच नागपूर जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले,माजी जी प सदस्य अनिल निधान,कांग्रेस पदाधिकारी अनुराग भोयर, कांग्रेस कामठी तालुकाध्यक्ष अनंता वाघ, राष्ट्रवादी चे पदाधिकारी उदयसिंग यादव, नौशाद सिद्दीकी, दिनेश पाटील, भाजप पदाधिकारी उज्वल रायबोले, कमल उर्फ लालू यादव, विनोदसंगेवार, राजकीरण बर्वे,मनीष कारेमोरे,उन्मेष महल्ले, प्रतीक पडोळे,योगेश डाफ, ऋषी भेंडे, बरीएम चे दिपंकर गणवीर,उदास बन्सोड,अनुभव पाटील, बसपा चे विकास रंगारी अशे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्याअनुषंगाने कामठी विधानसभा मतदार संघात 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत 27 मार्च रोजी प्रसिद्ध मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नाही अश्या मतदारांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.25 जून ते 24 जुलै या कालावधीत नियुक्त केलेले बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहेत तेव्हा जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत अशा पात्र उमेदवारांचे नमुना क्र 6 भरून द्यावे.मतदार यादीत मृत मतदार,दुबार मतदार,व जे मतदार त्यांच्या पत्यावर आढळत नाहीत अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करण्यात येईल.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करावयाचे असून या अंतर्गत आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल ,ठिकाणात बदल ,पत्त्यात बदल करून घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिद्ध मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबीर आयोजित करण्यात येतील.विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपापल्याजवळील मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र 6,7 आणि आठ स्वीकारतील.

19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येतील आणि 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘आणीबाणी एक काळा दिवस’ भाजपतर्फे सर्व जिल्ह्यांत प्रबोधन

Mon Jun 24 , 2024
– संविधानाची पायमल्ली करणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘त्या’ निर्णयाचा निषेध नोंदवून लोकांना करणार जागृत नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित २५ जून १९७५ रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com