कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म.नि.प.नियम २८९ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद, वाहनासह एकूण ४०,४०,०००/रु /- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Mon Dec 11 , 2023
– पोलीस स्टेशन मौदाची कारवाई मौदा :-दिनांक ०८/१२/२०२३ रोजीचे ०९.२० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहिती वरून मौजा एन. एवं ५३ टोल नाका माधनी येथे ट्रकद्वारे अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. अशा माहिती वरून माधनी टोल नाका येथे नाकाबंदी केली असता भंडारा कडुन मौदाकडे एक महिंद्रा कंपनीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com