पाणंद रस्त्यांची कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

• दर आठवड्याला आढावा घेणार 

नागपूर :- शेतातील विविध उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेत पाणंद रस्त्याची सुविधा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. याबाबत शासनाने प्राधान्याने विचार करुन जिल्ह्यातील 514 मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली आहे. यातील 455 पाणंद रस्त्याच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून ही कामे संबधित यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्त्याच्या कामाबाबत आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शेत पाणंद रस्त्याचा आढावा ठेवण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याची सुविधा ही आवश्यक असते. या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिलनाथ कलोडे यांच्यासह संबधित कार्यान्वीयन यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘चांदा ते बांदा’ योजनेला मिळणार गती, पर्यटन विभागाने अखर्चित निधी खर्चासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Fri Feb 16 , 2024
मुंबई :- चांदा ते बांदा योजनेंतर्गत सर्व कामे गतीने करावीत. पर्यटन विभागाचा या योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. चांदा ते बांदा योजनेंतर्गत मंत्रालयात आयोजित बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com