बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली – जयंत पाटील

मुंबई :- बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.

कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले असेही जयंत पाटील म्हणाले.

जनतेला भ्रष्टाचार आणि जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्नाटकच्या विजयाबद्दल काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्याकडूनश्री हनुमान चालीसा व मिठाईचे वाटप करत जल्लोष

Sun May 14 , 2023
कर्नाटक निवडणूक देशातील इतर राज्यातील परिवर्तनाची नांदी – गिरीश पांडव नागपूर :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत असे यश संपादन केले असून मोदी सरकारच्या अपयशाबाबत जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक देशातील इतर राज्यासाठी परिवर्तनाची नांदी ठरेल असे प्रतिपादन नागपूर काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांनी केले आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले असून भाजपचा दारुण पराभव झाला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com