संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15:-सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देत येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच राज्य निवडणूक आयोगाने आदेशीत केलेल्या सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम 2022 नुसार कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी कामठी नगर परिषद तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर इच्छुक नागरिकांना 10 ते 14 मे 2022 च्या कार्यालयीन वेळेपर्यंत कामठी नगर परिषद कार्यालयात सूचना , हरकती व आक्षेप लेखि स्वरूपात नोंदवन्याचे आव्हान करण्यात आले होते यानुसार काल 14 मे आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत एकूण 45 आक्षेपकर्त्यांनी प्रसिद्ध प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविला. या आक्षेपावर 23 मे पर्यंत जोल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत.
कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असून यावर प्रशासक कार्यरत आहेत.प्रशासक नेमल्यानंतर सहा महिण्याच्या आत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी विराजमान होणे आवश्यक आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या 22 फेब्रुवारी 2022 च्या परिपत्रकानुसार नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता .त्यानुसार कामठी नगर परिषद च्या वतीने 10 मार्च 2022 ला एकूण 17 प्रभागाची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यासाठी 10 मार्च ते 17 मार्च पर्यंत हरकती, आक्षेप व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या होत्या त्याप्रसंगी एकूण 10 अर्जदारांनी आक्षेप नोंदविला होता.मात्र वेळीच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेत राज्य शासनाने यात खोडा घातला व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.त्यावर 11 मार्च ला या प्रभाग रचनेवर स्थगिती आणण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 ला दिलेल्या सुनावणी निकालात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या व येत्या दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यात सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम दीला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कारवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यापासून सुरू करावी असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यानुसार निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कारवाहीच्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद कार्यालयात प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यावर इच्छुक नागरिकांना 10 मे ते 14 मे या कालावधीत आक्षेप, हरकती, सूचना नोंदविणे यावर 23 मे 2022 पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी देतील.तसेच जुन्या प्रभाग रचना कार्यक्रमा दरम्यान 10 मार्च 2022 कार्यक्रमानुसार त्यावेळी नोंदविलेल्या आक्षेप, हरकती व सूचना वर एकत्रित सुनावणी घेण्यात येईल.तर अंतींम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)