संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रिय परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल काल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.त्यानुसार कामठी छावणी परिषद येथील केंद्रीय विद्यालयमध्ये 12 विच्या वाणिज्य मध्ये शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी आदिती विजय बोपचे हिने 97 टक्के गुण प्राप्त करीत अकाऊंटसी विषयात 99 गुण प्राप्त करून कामठी शहरातून प्रथम येण्याचा क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल आदिती बोपचे हिच्यावर शाळेचे प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.तर हे सुयश हिच्या पालकासह रेखा गर्ग यांचे मिळालेले मार्गदर्शन मुळे मिळाले असल्याचे सांगितले.आदिती हिने उंच भरारी घेतली असून ती भविष्यात सी ए बनण्याची इच्छाशक्ती दर्शविली आहे.