संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ महासचिव अजय कदम यांच्या नेतृत्वात आज बरीएमंच्या शिष्टमंडळाने कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये डेंगु, मलेरिया, टाईफाईट, चिकन गुनिया व इतर आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कामठी शहरात होत असल्यामुळे व त्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा बळी जात असल्यामुळे व हे आजार सर्वत्र पसरत असल्यामुळे या आजारांना आळा घालण्यासाठी नगर परिषद ने यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करावी व अशा जिवघेण्या आजारांपासून कामठी शहराला मुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना या शिष्टमंडळात दिपंकर गणविर, उदास बंसोड, अश्फाक कुरैशी, सुभाष सोमकुवर, मनीष डोंगरे, अनुभव पाटील, मनोहर गनवीर, महेंद्र कापसे, सुरेश गजभिये, मो.नासीर ,बंटी रामटेके, उषा भावे, रेखा पाटील, रजनी गजभिये , पुष्पा मेश्राम, स्नेहल तांबे, ईत्यादी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.