राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा- गोंदिया ४९, गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरातून लांजेवार तर रामटेक मधून मेश्राम बसपाचे उमेदवार

Thu Mar 28 , 2024
नागपुर :- बसपा ने रामटेक मधून नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांना तर नागपुरातून योगराज लांजेवार यांना उमेदवारी दिली. आज बसपाच्या या दोन्ही उमेदवारांनी संविधान चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण व अभिवादन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष परमेश्वर गोणारे, प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, प्रदेश सचिव पृथ्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com