विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? – अमोल मिटकरी

नागपूर :- राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले नाही, याबद्दल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओळींचा दाखला देत राज्यसरकारचे कान टोचले.

या भागातील फलोत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळाली, कृषी विभागाने कोणतीही तपासणी केलेली नाही ही तपासणी कधीपर्यंत होईल, या नुकसानीला निकष काय लावले, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करणार, असे प्रश्न उपस्थित करून अमोल मिटकरी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला

Thu Dec 22 , 2022
– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली श्रद्धांजली नागपूर :- पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली. ते म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com