नितीश कुमारांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली का?; शरद पवारांचं थेट उत्तर

मुंबई :- देशात सर्वात मोठा लोकशाही उत्सव होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. अशात आता देशात कुणाचं सरकार येणार? याची सर्वत्र चर्चा होतेय. अशात इंडिया आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची बातमी आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केला आणि उपपंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची बातमी आली. यावर आता खुद्द शरद पवारांनीच भाष्य केलं आहे. लोकसभेची मतमोजणी सुरु असतानाच शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत.

नितीश कुमारांना फोन केला?

नितीश कुमारांशी चर्चा केली का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं नाही. ते एका राज्याचे प्रमुख आहेत. अधिक माहिती नाही. त्यामुळे बोलणार नाही. त्यांच्याशी माझे संबंध आहेत. पण त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं शरद पवार म्हणाले.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशीहील शरद पवारांचं फोनवर बोलणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही शरद पवारांनी उत्तर दिलंय.मी चंद्राबाबूंशी बोललो नाही. त्यात तथ्य नाही. माझं बोलणं फक्त काँग्रेसच्या अध्यक्षांशी झालं. या चर्चा करण्याचं धोरण आमच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांशी चर्चा करूनच घेऊ, असं शरद पवार म्हणाले.

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत धक्कादायक निकाल, उज्वल निकम पराभूत

Tue Jun 4 , 2024
उत्तर मध्य मुंबईत प्रसिद्ध वकिल उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात सामना आहे. भाजपाने या मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापला व त्यांच्याजागी उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. भाजपाने अखेरच्या क्षणी उज्वल निकम यांना उमेदवार बनवलं. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ आला. काँग्रेसने इथून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. मागच्या दोन टर्मपासून उत्तर मध्य मुंबईच्या मतदारांनी पूनम महाजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com