कामठी तालुक्यात वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 24:-भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो.सृष्टीतील प्रत्येक सजीव , निर्जीवरप पूजनीय आहे.सारे सणवार ही एक प्रतिके आहेत.समाजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सुदृढ समाज दीर्घकाळ टिकावा या मुख्य उद्देशाने स्त्रीयांचा खास मानला जाणारा वटसावित्री उत्सव कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य , दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वटसावित्रीची पूजा करण्यात आली.यावेळी वट वृक्षांची पूजा व प्रार्थना करण्यात आली. या सनाविषयी जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार सावित्रीच्या पतीचे प्राण हरण करण्याकरिया यमराज आला असता तिने पती बरोबरच जाण्याचा हट्ट धरला यमराज सावित्रीने मागितलेल्या तीन वरास यमाने तथास्तु म्हटल्यामुळे यमास सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हूणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात याच आख्यायिके नुसार आजही वटपौर्णिमेला विवाहितस्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करून त्याभोवती प्रदक्षिणा घातली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समता सैनिक दलाची स्थापना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली-मार्शल वीरेंद्र मेश्राम

Wed Jun 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 14- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली . २४ सप्टेंबर. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com