उमेदने 2 लाख 65 हजार कुटुंबात आणली आर्थिक समृद्धी

Ø जिल्ह्यात 25 हजारावर समुहांची स्थापना

Ø यावर्षी समुहांना 260 कोटींचे बॅंक लिंकेज

Ø समुहातील 53 हजार महिला ‘लखपती दिदी’

यवतमाळ :- महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरले आहे. अभियानातून जिल्ह्यात 25 हजारावर स्वयं सहायता समूहांची स्थापना झाली असून या समुहातील 2 लाख 65 हजार कुटुंबात आर्थिक समृद्धी आली आहे. सुरुवातीस छोट्या व्यवसायात रमणाऱ्या समुहांच्या महिला आता उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करतांना दिसत आहे.

ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या सक्षम व स्वायत्त संस्था उभारून त्यांना वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी उमेद अभियान चालविले जात आहे. सामाजिक, आर्थिक, वित्तीय समावेशन व सार्वजनिक सेवांची उपलब्धी व विकास योजनांचा लाभ हे या अभियानाचे आधारस्तंभ आहे. हाच आधार पुढे नेत जिल्ह्यात अभियानाची वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 25 हजार 673 समुहांची स्थापना झाली आहे. या समुहांमधील 2 लाख 47 हजार कुटुंबे आर्थिकदृष्ट्या समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.

अभियानाचे गावपातळीवर उत्तमप्रकारे कामकाज होण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 403 ग्रामसंघ तर 63 प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहे. केवळ महिला शेतकऱ्यांद्वारे संचालित तब्बल 24 उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आहे. ईतक्या कंपन्या स्थापन करणारा यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. ईतर उत्पादक संघ 988 इतके आहेत. या उत्पादक संघांना 2 कोटी 4 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

उमेदअंतर्गत जिल्ह्यात 6 उद्योग विकास केंद्र तर 97 वन धन विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. स्वयं सहाय्यता समुहांना आर्थिक सहाय्यासाठी बॅंकांशी जोडण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात 8 हजार 196 समुहांना तब्बल 260 कोटींचे लिंकेज देण्यात आले आहे. 21 हजार 777 समुहांना 35 कोटी 83 लाख रुपयांचे खेळते भांडवल तर 14 हजार 157 समुहांना 84 कोटी 94 लाखाचा समुदाय गुंतवणुक निधी वितरीत करण्यात आला आहे.

उमेद अभियानांतर्गत सहभागी महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी लखपती दिदी कार्यक्रमांतर्गत त्यांचे उत्पन्न 1 लाख इतके करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत विविध समुहातील 53 हजार 60 महिलांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक झाले आहे. उर्वरीत 1 लाख 5 हजार समुहातील महिलांचे उत्पन्न विविध उद्योजकीय योजनांचा लाभ देऊन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेडयात भंगार गोदामाला भीषण आग,आगीत लाखो रुपये किमतीचे भंगार साहित्य जळून खाक,सुदैवाने जीवितहानी टळली

Wed Feb 5 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील ग्रा प कार्यालय जवळील देशमुख भंगार गोदामाला भर सकाळी 7 दरम्यान अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजल्याची घटना घडली असता वेळीच गोदाम मालक व परिसर नागरिकांनी मदतीची धाव घेत आग विझविन्याचा प्रयत्न केला.वेळीच पुढाकाराची भावना घेऊन डॉ नकीब व ग्रा प सदस्य अनिल पाटील यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!