![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी :- वैशाख पोर्णिमेला तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि वैशाख पोर्णिमेलाच त्यांचे महापरिनिर्वान घडले.सुखी समृद्ध जीवनासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज असून सर्वांनी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून या महामानवांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.आणि जगाला युद्धाची नाही तर बुद्धांचे विचारच तारू शकतात असे मौलिक कामठी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर यांनी
प्रबुद्ध नगर येथे आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.दरम्यान माजी नगराध्यक्ष गुड्डु मानवटकर यांनी प्रबुद्ध नगर स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीला साउंड सिस्टिम भेट देण्यात आले ज्यामुळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरन समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकरचे मनपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी प्रबुद्ध नगर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून सामूहिक वंदना घेण्यात आली तसेच धम्मध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी मोहन सातपुते, राजेश वाघमारे, सिद्धार्थ गजभिये,अशोक वानखेडे,बाळा नगरारे,आनंद कांबळे,अंजन
डंभारे,सतीश कुंभारे,राजू चंद्रिकापूरे,रितेश गजभिये,नितेश टेंभेकर व नागरिक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.