नवी दिल्ली :- आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान म्हणाले:
“आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि त्याचबरोबर आपल्या सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो”.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपले मार्गक्रमण सुरु असताना, हा अहवाल विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने पुढील वाटचाल करण्याची क्षेत्रेही निर्धारित करतो.