नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात मंगळवारी (ता.२७) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मनपा मुख्यालयातील वॉर रूम मध्ये झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वसुंधरा भोयर , डॉ. विजय तिवारी, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. मेघा जैतवार, डॉ. प्रिती झरारिया, डॉ. देवस्थळे, डॉ. बकुल पांडे, डॉ. माने, डॉ. हिना कुरेशी यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक प्रामुख्याने उपस्थित होते.      बैठकीत सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली.

डॉ. मोहम्मद साजीद यांनी संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी झोन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. नियमित लसीकरणासंदर्भात ‘प्लॅनिंग’ करणे, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी देण्यात आले.

या महिन्याच्या अखेरीस बालकांच्या शाळा सुरु होणार असून ‘डिप्थेरिया’ सारखे आजार मुलांना होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी शाळांमध्ये जाऊन मुलांचे लसीकरण करण्याचे देखील निर्देश यावेळी देण्यात आले. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जी बालके वंचित राहिली असतील अशा बालकांचे लसीकरण करण्यात यावे, या दृष्टीने प्रयत्न करण्याचेही निर्देश देण्यात आले.

याशिवाय पालकांनीही त्यांच्या बाळांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ते करून घ्यावे किंवा आपल्या नियमित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी सरकारच्या कामांची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचवावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Thu Jun 29 , 2023
मुंबई :-मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com