स्वच्छ भारत अभियान : रस्त्यालगत वैद्यकीय कचरा टाकला, १० हजार दंड

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.२१) रोजी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरूनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासह टाकल्यासंदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जयप्रकाश नगर वर्धा रोड येथील प्रभू अपार्टमेंट यांच्याविरुध्द रस्त्यालगत गिट्टी पसरविल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत खरे टाऊन पूनम अपार्टमेंट येथील कुलकर्णी बिल्डर्स यांच्याविरुध्द इमारत तोडतांना वायुप्रदूषण केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत घाट रोड येथील डिप्लोमॅट रेस्टॉरेट अँड बार, कॉटन मार्केट येथील हाय टी कॉपरन, अशोक ट्रेडर्स, दर्पण डिस्पोजलस यांच्याविरुध्द प्लास्टिक वापरण्याबाबत कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरूनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासह टाकल्यासंदर्भात सक्करदरा येथील विश्वसुख आयुर्वेद क्लिनिक यांच्या विरुध्द कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी घास बाजार येथील नानोटी क्लासेस यांच्या विरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात लावल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रेमनगर झेंडा चौक येथील यांच्याविरुध्द प्लास्टिक वापरण्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन

Sat Apr 22 , 2023
मुंबई रामकृष्ण मिशनचे आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद: राज्यपाल रमेश बैस   विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना रामकृष्ण मिशन सोबत काम करण्याची सूचना भुकेल्याला अन्न देतो, तो खरा धर्म असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. विवेकानंदांचे हे स्वप्न साकार करायचे असल्यास काम करण्याच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कौशल्य शिक्षण मिळाले पाहिजे. शासन व विद्यापीठे युवकांना कौशल्य शिक्षण देत असताना रामकृष्ण मिशन सारख्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com