उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांच्या तल्लख बुद्धीला चालना-आकाश भोकरे

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 10:- बालक हे कुंभाराच्या कच्च्या मडक्यासारखे असतात.बालवयात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या उभ्या आयुष्यभर सोबत घेऊन स्वतासह समाजाची सेवा करतात .त्यांच्यावर बालवयात झालेले संस्कार त्यांच्यातल्या बुद्धीला चालना मिळून उद्याचे भविष्य घडविण्याकरिता बाल संस्कार शिबिर,उन्हाळी शिबिर अनमोल ठरतात असे मौलिक प्रतिपादन 15 दिवसीय स्वच्छंद समर कॅम्प च्या उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक शिवभक्त आकाश भोकरे यांनी व्यक्त केले.
सायली हॉस्पिटल , बॉक्सिंग ट्रेनिंग सेंटर कामठी येथे आज 10 मे पासून 15 दिवसीय स्वच्छंद समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले . या कॅम्प मध्ये 70 मुले, मुलींच्या समावेश झालेला असून या कॅम्प मध्ये योगा, सूर्यनमस्कार , आत्मरक्षण टेकनिक, बॉक्सिंग , परसनलिटी डेवलपमेंट व इतर मैदानी खेळाचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ सुमित पैडलवार, आणि शिवभक्त आकाश भोकरे मार्फत करण्यात आले . याप्रसंगी शिवभक्त पंकज नालेंद्रवार सह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन निशा चौधरी, महल्ले मैडंम, खुरगे मॅडम यांच्या वतीने करण्यात आलेले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बुद्ध जयंतीनिमित्त विहारा विहारात गुंजतोय धम्मदेसना ची गुंज

Tue May 10 , 2022
संदीप कांबळे, कामठी –दहा दिवसीय विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रम कामठी ता प्र 10:-आजच्या वर्तमान स्थितीत जगावर युद्धाचे सावट पसरले आहे या परिस्थितीतून समस्त मानव जातीला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचे विचारच या बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वात शांतता स्थापित व्हावी, बुद्धांचे विचार पुनःश्च अंगीकृत केले जावे आणि मानव सदमार्गाला लागावा म्हणून भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com