रायपूरची सौरक्रांती: वर्धा जिल्ह्याचे नवे ‘हरित’ गाव!

वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील रायपूर गावाने सौर ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देवळी तालुक्यातील या गावाने 100 टक्के सौर ऊर्जेचा वापर करून जिल्ह्यातील तिसरे सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत चिचघाट राठी आणि नेरी (पुनर्वसन) पाठोपाठ या सौरग्रामच्या यादीत रायपूरचे नाव आता जोडले गेले आहे.

गावातील 18 घरगुती आणि 1 पथदिव्याच्या वीज जोडण्या आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहेत, ज्यामुळे गावकऱ्यांचे वीज बिल शून्यावर येणार आहे. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेत 16 घरांच्या छतावर प्रत्येकी 2 किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसविण्यात आले आहेत. तसेच, एका घरावर 1 किलोवॅटचा प्रकल्प आणि पथदिव्यांसाठी 1 किलोवॅट क्षमतेची विनाअनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमधून दरमहा सरासरी 5,100 युनिट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे.

रायपूरला 100 टक्के सौर गाव बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदिप घोरुडे, देवळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रेम तेलरांधे, सहाय्यक अभियंता मयूर हेडाऊ आणि जनमित्र संतोष आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे रायपूर गावातील नागरिकांना केवळ आर्थिक फायदा होणार नाही, तर पर्यावरण संवर्धनातही रायपूरचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिंगणी उपकेंद्राला मिळाले आयएसओ मानांकन

Wed Apr 2 , 2025
वर्धा :- वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणी या 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 आणि आयएसओ 45001:२2018 चे मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे आर्वी आणि पिंपळगाव पाठोपाठ आतएसओ नामांक्न मिळविणारे हिंगणि हे वर्धा जिल्हातील महावितरणचे तिसरे उपकेंद्र ठरले आहे. जिल्ह्यातील वर्धा विभागा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!