ट्रक दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यु, तर दुसरा गंभीर जख्मि

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील एस के पोरवाल कॉलेज समोर नवीन कामठी कडून कामठी शहरात जाणाऱ्या एक्टिवा गाडीला अनियंत्रित टिप्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली तर दुसरा गंभीर जखमी असून नागपूर च्या मेयो इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे.यात मृतकाचे नाव वंश शेखर वानखेडे वय 18 वर्षे राहणार जय भीम चौक कामठी तर जख्मि तरुणाचे नाव आवेश शैलेश शेंडे वय 18 वर्षे रा गादा कामठी असे आहे. नवीन कामठी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मृतक वंश शेखर वानखेडे वय 18 वर्ष व आवेश शैलेश शेंडे वय 18 वर्ष राहणार गादा हे दोघेही नवीन कामठी परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिकत असून दुपारी दोन वाजता सुमारास कॉलेज सुटल्याने वंश शेखर वानखेडे याची एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 40 बी वाय 7988 ने आवेश शैलेश शेंडे ला सोबत गाडीवर बसवून कामठी कडे जात असताना मागच्या दिशेनि आलेला अनियंत्रित टिप्पर क्रमांक एम एच 40 वाय 0871 ने जबर धडक दिल्याने एक्टिवा गाडी चकना चूर झाली अपघातात घटनास्थळीच वंश शेखर वानखेडे याचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी आवेश शैलेश शेंडे याला नागरिकांनी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला मेयो नागपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहेत तर मृत्यूशी झुंज देत आहे.

अपघाताची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सहकार्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहन नवीन पोलीस स्टेशनला जमा केले व वाहतूक सुरळीत केली .नवीन कामठी पोलीस स्टेशनला टिप्पर चालकाचे विरोधात कलम 304,(1), 279, 338 नुसार गुन्हा दाखल करून टिप्पर चालक अब्दुल आरिफ वय 56 राहणार गणेश लेआउट न्यूयेरखेडा कामठी यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमृत महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार येरखेडा ग्रामपंचायतला

Fri Nov 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अमृत महाआवास अभियान योजनेचा सण 2021–22 राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायतला नुकताच शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अमृत महाआवास अभियानाची सुरुवात सन 2021- 22 या सत्रात केली असता बहुमजली इमारत अभियानात येरखेडा ग्रामपंचायत ने संपूर्ण राज्यात उत्कृष्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com