मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधानपरिषदेत मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर

मुंबई :- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 19 जुलै रोजी विधानपरिषदेत मांडलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

विधानपरिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा भाग होता. या भागावर निजामाची राजवट होती. मराठवाडा भारतात विलीन होण्यासाठी अनेक हुतात्मे, स्वातंत्र्यसेनानी यांनी कार्य केले आहे. या स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान मोठे होते. दगडाबाई शेळके, गोदावरी किसनराव टेके यांच्यासह अनेक महिला स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपले योगदान दिले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाने देशाला दिशा देण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सुरेश धस, राजेश राठोड, विक्रम काळे, अरुण लाड, महादेव जानकर यांनी प्रस्तावावर आपले विचार मांडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपराष्ट्रपती 4 ऑगस्टला नागपूर भेटीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Fri Jul 21 , 2023
नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा 4 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर येथे नियोजित दौरा आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव तसेच राष्ट्रीय कर अकादमीचा कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com