नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन १६ सप्टेंबरपासून सुरु – ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी

– चंद्रपूर- बल्लारशाह रेल्वे स्थानकावर होणार भव्य स्वागत

चंद्रपूर :- नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी आणि त्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री आश्विनीकुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटत दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सोमवारी १६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी ६.२० वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.४० वाजता नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यास नागपूरसह विदर्भातील सर्वसामान्यांसह विद्यार्थी,रुग्ण, व्यापारी,नागरिक या सर्वांना मोठा लाभ होणार असल्याचेही ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले होते. पत्र व्यवहारानंतर या मागणीसंदर्भात ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसला मंजुरी प्रदान करण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा विदर्भातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.सोमवारी १६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी ६.२० वाजता आणि बल्लारपूर येथील जनतेकडून सायंकाळी ६.४० वाजता नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात ना.सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार देखील मानण्यात येईल, अशी माहिती भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच झेडआरयूसीसी मध्य रेल्वे झोन मुंबई चे सदस्य, एनआरयूसीसी रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली चे सदस्य अजय दुबे यांनी दिली आहे.

एकूण पाच थांबे, त्यातील दोन चंद्रपूर जिल्ह्यात

अतिजलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही २० डब्यांची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) हे ५७८ किलोमीटर अंतर ताशी १३० किमी वेगाने पार करेल. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच थांबे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन थांबे चंद्रपूर जिल्ह्यातच देण्यात आले आहेत. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने चंद्रपूर जिल्हावासीयांना ही भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फिनलँड संसदीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा

Fri Sep 13 , 2024
मुंबई :- भारत भेटीवर आलेल्या फिनलँड संसदेच्या वाणिज्य विषयक समितीच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. १२) समितीचे अध्यक्ष सकारी पिस्टो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांचे कुलगुरू देखील उपस्थित होते. फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत एरिक एफ हॉलस्ट्रॉम हे देखील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com