– सुनिल केदार यांनी “वनमॅन आर्मी” ची भुमीका निभावत रामटेकात फडकविला झेंडा
नागपूर :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचेउमेदवार बबलू उर्फ श्याम बर्वे नी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार राजु पारवेचा पराजय करीत यश संपादन केले.टिळक भवन,मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त खासदारांची बैठकीला उपस्थिती दर्शवली प्रसंगी नवनियुक्त खासदारांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रभारी रमेश चेन्नीथला ,सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री ,विजय वडेट्टीवार (वीरोधी पक्ष नेता) सुनील केदार माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक लोकसभा मतदान संघात विजयश्री खेचून आणल्या बद्दल मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मागील दहा वर्षांपासून पिछाडीवर होती. काँग्रेस करीता ही लोकसभा निवडणुक सहज नसल्याने या ठिकाणी युतीच्या उमेदवार हमखास निवडुन येईल असे असताना काँग्रेस या क्षेत्रात सुनिल केदार यांनी “वन मॅन आर्मी” ची भुमीका निभावत ही निवडणुक खांद्यावर घेत गाव नी गाव,खेडेपाडे पिजुन काहडले. रात्रंदिवस मतदारांच्या भेटी घेत ही निवडणुक चुरशिची केली. कोणताही पक्षाच्या मोठा नेता या भागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आला नाही. तरीही सुनिल केदारानी आपले सैन्य या निवडणुकीत कामाला लावले. जिंकायच्या प्रण मनात घेऊन नियोजन केले. तया दुपटिने आखनी करून प्रचार केला.जिल्हा परिषद चे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, गावागावात प्रचाराच्या कामात लावले व विजय खेचून आणला हे विशेष.