लोककल्याणकारी प्रकल्पांद्वारे कर्मवीर दादासाहेबांची जन्मशताब्दी साजरी व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ

नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वसामान्य जनता आणि बिडी कामगारांसाठी संघर्ष उभारुन अधिकार मिळवून दिले. दादासाहेबांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे यासाठी विविध लोककल्याणकारी प्रकल्प उभारुन त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे व्हावे, अशा भावना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केल्या.            कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात आज पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार चंद्रशेखर बावणकुळे, माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुरेखा कुंभारे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे आदी यावेळी उपस्थित होते.          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादासाहेबांच्या कार्यामुळे जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. कर्मवीर दादासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही भूमिका आपल्या कर्तृत्वातून चोख बजावत बाबासाहेबांचे अनुयायीत्व सिद्ध केले. उच्च शिक्षण घेऊन दादासाहेबांनी समाज संघटित केला, संघटनेतून संघर्ष निर्माण करुन सामान्यांना न्याय मिळवून दिला. संघर्षातून व बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेले नेर्तृत्व हे दादासाहेबांच्या कार्यातून दिसून येते.           दादासाहेबांच्या कार्याचा वसा त्यांची लेक ॲड. सुरेखा कुंभारे समर्थपणे पुढे नेत आहेत व या कार्यास बळकट करीत आहेत. दादासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे विविध लोककल्याणकारी प्रकल्प राबविण्यात यावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच, त्यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस येथे यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह आणि फुड कोर्टचे उद्घाटन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Thu Mar 23 , 2023
धुळे :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यात धुळे जिल्हाही आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिला. धुळे तालुक्यातील आनंदखेडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com