संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील वारेगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे कमलाकर बांगरे यांनी भाजप समर्थित गटाच्या कांचन गुंडाळे यांच्या दोन मताने पराभव करून उपसरपंच पदी विजयी झाले. आज वारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाकरिता सरपंच रत्नाबाई अजबराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती उपसरपंच पदासाठी काँग्रेस समर्थक गटाकडून कमलाकर बांगरे यांनी तर भाजप समर्थित गटाकडून कांचन गोडाळे व अपक्ष म्हणून चेतन गोडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुपारी दोन वाजता सुमारास उपसरपंच पदाच्या निवडणुकीला सुरुवात केली असता कमलाकर बांगरे यांना 5 मते ,कांचन गोडाळे यांना 3 मते तर चेतन गोडाळे यांना 2 मते मिळाली सभेचे अध्यक्ष रत्नाबाई अजबराव उईके यांनी कमलाकर बांगरे हे उपसरपंच पदी विजय झाल्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पंकज लोखंडे ग्रामविकास अधिकारी अरुण बोंद्रे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. कमलाकर बांगरे यांचे उपसरपंच पदी निवडून आल्याचे जाहीर करताच उपसरपंच कमलाकर बांगरे यांनी कांग्रेस चे नेते माजी मंत्री सुनील केदार,माजी जी प सदस्य सुरेश भोयर, सभापती दिशा चनकापुरे, सरपंच रत्नाबाई उईके, माजी सरपंच प्रतिभा चिखले, कमला लेकुरवारे ,माजी उपसरपंच राजेश मेश्राम ,अजबराव उईके, वासुदेव सहारे जीवतु देवरे ,नाना पुंडे आदींचे आभार मानले.