कामठी शहरातील अतिक्रमण कोण काढणार?

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 25 :- कामठी नगर परिषद च्या मागिल पंचवार्षिक काळात कामठी शहरात अतिक्रमण चा वेढा पसरला असून सत्ताधारी राजकीय आश्रयातून जागोजागी अतिक्रमण थाटून पक्के बांधकाम करण्यात आले इतकेच नव्हे तर त्या अतिक्रमित जागेवर कर लागू करून जागा नियमित करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी सुद्धा करण्यात आली आहे.या अतिक्रमण कारी नागरिकांना स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने दिलेल्या चिरीमिरीतून ‘तेरी भु चूप मेरी भी चूप’या विचारसरणीत शहरात जिकडे तिकडे अतिक्रमण वाढले आहे तेव्हा हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण?असा प्रश्न नागरिकाकडून केल्या जात आहेत.
अतिक्रमणाचा वनवा दिवसेंदिवस सारखा लांबत आहे. शहरातील महामार्गाच्या कडेला अतिक्रमण कारीनी बिनधास्त पणे दुकाने थाटून बसले आहेत तर शहरातील अनेक रस्त्यांचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहेत.जागेच्या मालकी हक्काचा कुठलाही पुरावा नसतानाही अतिक्रमण करीत आहेत.12 फेब्रुवारी पासून नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू झाल्याने आता कुठलंही राजकीय हस्तक्षेप राहणार नसल्याने प्रशासक श्याम मदनूरकर यांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना हाताशी धरून अतिक्रमण पथक निर्माण करून शहरातील अवाढव्य अतिक्रमण बाहेर काढून अतिक्रमण मोहीम राबवावी व अतिक्रमन काढलेल्या जागेवर नगर परिषद प्रशासनाने त्वरित कबजा करीत पुढचे नियोजित विकासकामे करावी अशी मागणी जोर धरत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा..

Fri Feb 25 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 25 :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्राकृतिक नैसर्गिक सेंद्रिय, गांडूळखत पद्धतीने शेती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी यांनी तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिनाच्या पर्वावर आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रंनाळ्याच्या संयोजिका राजयोगी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!