सुप्रसिद्ध साहित्यिक कवी कल्पना टेंभूर्णीकर यांच्या कविता संग्रह शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा – बागडे

नागपूर :- कल्पनेच्या महासागरातून मानवनिर्मित कल्पना करून दीन दलितांच्या भावना आपल्या लेखनातून अधोरेखित करणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिक कवी कल्पना टेंभूर्णीकर यांच्या कविता संग्रह शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात याव्या. याकरिता आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा शासन दरबारी मागणी रेटून धरणार आहे. असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी केले. ते त्यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक विमोचनाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता बोलत होते. परिवर्तन विचार मंचच्या वतीने त्यांच्या कविता संग्रह पुस्तकांचे विमोचन करून कल्पनाच्या कल्पनेची दखल घेतल्याने या मंचचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले, येत्या 5 डिसेंबर रोजी, मुंबई येथील रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मारकाच्या सभागृहात त्यांच्या जंगी सत्कार करण्यात येणार आहे. जेणेकरून या कविता संग्रह संपूर्ण देशात पोहोचले पाहिजे. असे बागडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा चेतना मंच कामठी तर्फे किल्ला स्पर्धेचे भव्य पुरस्कार वितरण संपन्न.

Sun Oct 30 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना कळवा या हेतूने दिवाळीनिमित्त शिवकालीन किल्ला स्पर्धेचे आयोजन युवा चेतना मंच कामठी तर्फे कामठी तालुका मध्ये करण्यात आले होते . या स्पर्धेचे पुरस्कार वितरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे सी आर पी एफ चे निवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , ऑलम्पिकचे स्वर्ण पदक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com