मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४८ वा स्थापना दिवस मुंबई येथील तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात साजरा करण्यात आला.
भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस ‘तटरक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले.