माजी आमदार देवराव रडके यांनी केली आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकत्याच 19 एप्रिल ला संपन्न झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.मात्र आता लोकसभा निवडणूक संपन्न झाली असून आदर्श आचारसंहितेच्या नावावर प्रशासकीय अडचणीचे कारण दर्शवित विविध कामांना थांबा देण्यात आल्याने विविध विकास कामे रखडले आहेत.तेव्हा रखडलेली विकास कामे लक्षात घेता नागरिकांच्या हितार्थ लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी माजी आमदार देवराव रडके यांनी केले आहे.

कामठी तालुक्यात उष्णतेचा जोर वाढला असून उन्हाच्या झळा वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी व चारा टंचाई चा सामना करावा लागत आहे. शेतीकामातील खरीप पिकाचे नियोजन झाले असून अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीकामाच्या भावना लक्षात घेता व नागरिकांचे हित जोपासून कामठी तालुक्यात लागू असलेले आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी माजी आमदार देवराव रडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात सूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण!

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.त्यामुळे घामाघूम झालेले नागरिक मजूर,शेतमजूर,दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती करीत आहेत तसेच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उष्णतेमुळे चिमुकली बालके,रुग्ण, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत.उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.भर दुपारी 1 ते चार वाजेदरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com