संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासनाने ग्रामीण जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर काही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय सुरू केले आहेत त्यातील विदर्भातील जी काही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहेत त्यातील सर्वात मोठे उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठी च्या उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. समाजातील गोरगरीबासाठी सुरू असलेले 50 खाटाचे रुग्णालय हे 100 खाटात विस्तारित करण्यात आले.ग्रामीण जनतेला कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवा मिळा वी यासाठी शासन प्रामुख्याने लक्ष पुरवीत असली तरी या रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या रुग्णालयाचे एकूण डॉक्टर ,अधिकारी, कर्मचारी पैकी बोटावर मोजणारे कर्मचारी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या आदेशाचे पालन करीत असून बहुतांश डॉक्टर कर्मचारी वर्ग या आदेशाला तिलांजली देत आहेत. शासकीय रुग्णालयाला जागा कमी पडत असल्याचे निमित्त साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती कार्यालय परिसरात हलविण्यात आले तसेच ए आर टी सेंटर सुद्धा नजीकच्या क्वार्टर मध्ये हलविण्यात आले मात्र खाली करण्यात आलेल्या कार्यालयीन इमारती अजूनही अनुपयोगी आहेत तसेच रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे मागील दहा वर्षांपासून वर्षांपासून दुरावस्था असल्याने या दोन्ही विंग मधील 20 क्वार्टर पैकी फक्त चार कर्मचाऱ्यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत.
लाखोंच्या लोकसंख्या असलेल्या कामठी शहरात पूर्वीपासून आरोग्याशी संबंधित शासकीय रुग्णालय तसेच खाजगी डॉक्टरांचा अभाव असल्याने येथील प्रसिद्ध उद्योगपती सेठ रामनाथ लोहिया आणि स्व रायसाहेब हिरालाल शुक्ला यांनी सन 1934 मध्ये ग्रामीण कुटीर रुग्णालयाची स्थापना केली होती.ज्याचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर सर हँडगोवन यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 1934 रोजी करण्यात आले होते.ते या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होते.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयाची जवाबदारी नगर परिषदकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर हे रुग्णालय राज्य शासनाच्या अखत्यारीत आल्याने या कुटी रुगनालयाचे नाव बद्दलवुन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय असे झाले त्यावेळी या रुग्णालयात फक्त 30 खाटाची व्यवस्था होती.अपुरी रुग्ण व्यवस्था लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अथक प्रयत्नातून हे रुग्णालय 30 खाटाहून 50 खाटाचे करून आधुनिक सोयी सुविधा मिळावे यासाठी 19 डिसेंबर 1999 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर,माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर जून 2004 मध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ खालीतूल्लाह यांच्या हस्ते लोकार्पण होऊन 50 खाटाच्या रुग्णालयासह आधुनिक पद्धतीच्या रुग्णसेवेची व्यवस्था सुरू करण्यात आली.
शासनाने कामठी उपजील्हा रुग्णालयाच्या या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आहेत मात्र हे निवासस्थान राहण्यायोग्य नसूनही मागील काही वर्षांपासून चार कुटुंब वास्तव्यास आहेत. या निवासस्थानात दुरावस्था असून खिडक्या,दरवाजे तुटलेले आहेत,विद्दुत व्यवस्था नाही अशा अनेक दुरावस्था आहेत.तेव्हा या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनाच्या दुरावस्थेकडे लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरत आहे.