मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत;दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

– पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी – पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

एरटेल कंपनीचे टावर लोकवस्तीतुन काढण्यास प्रहार व नागरिकांचे नप ला घेराव

Fri Feb 4 , 2022
 – सात दिवसात कारवाई करा अन्यथा नप समोर बेमुदत ठिया आंदोलन – रमेश कारेमोरे.  कन्हान : – नगरपरिषद अतंर्गत प्रभाग क्र. ७ येथील जुबेर शहिद खान च्या इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचे टावर लावण्यात आल्याने या टावर च्या रेडि एशन मुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदे ला निवेदन देऊन तात्काळ दाट लोकवस्ती मध्ये लाव लेला एरटेल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com