नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाद्वारे बुधवार (ता.12) राम नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.
माजी आमदार प्रा. अनिल सोले महापौरपदी असताना या अभियानाची संकल्पना मांडली होती. रामनगर चौकात अनिल सोले यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रिया जोगे, पिनाकी बनिक, प्रतिक इसमपेल्लीवार आदींनी जनजागृती केली. त्यांना मनपाचे सुनील नवघरे व आशिष इंगळे यांचे सहकार्य लाभले.
स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या अभियानाला रामनगर चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.