सामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याची विधिमंडळात क्षमता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला समृध्द लोकशाही दिली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संधीची समानता शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी सभागृह काम करत असते. लोकशाहीचे ज्ञान, सखोल माहिती लोकांपर्यंत पोहचावी, त्याचा अभ्यास व्हावा, प्रक्रिया समजावी व त्याची प्रगल्भता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभ्यास वर्ग महत्वाचा आहे. राज्य घटनेने विधान मंडळांना दिलेल्या अधिकारानुसार विधानमंडळाचे कामकाज होते. या अधिकारानुसार सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम होत असून विधानमंडळ हे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविकात संसदीय अभ्यासवर्गाची परंपरा, महत्त्व आणि इतिहास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार अॅड. शेलार यांनी केले.

यंदाच्या अभ्यास वर्गामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधील राज्यशास्त्र व लोक प्रशासन विषयातील 81 विद्यार्थी व 12 अधिव्याख्याता सहभागी झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला जिल्ह्यातून ६ हजाराच्यावर कार्यकर्ते जाणार पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष किरण अतकारी यांची माहिती

Mon Dec 11 , 2023
भंडारा :- आ. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप दि. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथे होणार आहे. या समारोपाला भंडारा जिल्ह्यातून ६५० च्यावर गाड्या जाणार असून त्यातून ६ हजारच्यावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण अतकारी यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेला भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, भंडारा शहराध्यक्ष मधूकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com