परवानाधारक व्यक्तींना आपली शस्त्रे नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आलेली असून दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत (निवडणुकीची घोषणा केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत) अस्तीत्वात राहणार आहे. या कालावधीत शत्र अधिनियम 1959 च्या कलम 21 मधील तरतूदीनुसार परवानाधारक व्यक्तींनी आपली शस्त्रे त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. हे आदेश निर्गमीत केल्याच्या दिनांकापासूनस 3 दिवसांच्या आत संबंधितांनी शस्त्र जमा करणे अनिवार्य आहे.

हा मनाई आदेश जो समाज दिर्घकालीन स्थायी कायदा, रुढी व परंपरा यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. तथापी, अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था, निवडणूक शांततेच्या मार्गान पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्रे अडकावून ठेवण्यास जिल्हा प्रशासनावर कोणताही प्रतिबंध असणार नाही. सदर आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांचेकडील असलेले शस्त्र वगळण्यात येत आहे.

पंरतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील शस्त्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता व जबाबदारी संबंधीत बँक/संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील. तसेच अपवादात्मक परीस्थितीत शस्त्रे जमा करण्यापासून सूट मिळण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा छाननी समितीकडे अर्ज करण्याची मुभा राहील. हा आदेश 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर पर्यतच्या कालावधी करीता अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Fri Oct 18 , 2024
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com