मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विधानसभेसोबतच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांवरही भाष्य केलं आहे. 7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं संजय राऊत म्हणालेत.