संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दसऱ्याच्या पर्वावर रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुईगंज क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रावण दहन उत्सव समितीच्या वतीने सजविलेल्या रथावर भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची ढोल- ताशे फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूकीने येऊन रावण दहन करण्यात आले. रावण दहन झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना आपट्याचे पानाचे सोनं देऊन शुभेच्छा दिल्या.
रावण दहन कार्यक्रमाला माजी मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर ,राजेश शर्मा, मूलचंद सीरिया इतर गनमान्य नागरिक सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.रावण दहन कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस उपायुक्त निकेतन कदम ,जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे , नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.